Thursday, September 7, 2023

वेरुळचे कैलास मंदिर


महाराष्ट्रातील एलोराच्या लेण्यांमध्ये असलेले हे मंदिर भगवान शिवला समर्पित आहे. कैलास मंदिर हे एक मोठे दगड कापून बांधलेले सर्वात मोठे मंदिर आहे. कैलास मंदिराची खास गोष्ट म्हणजे या मंदिराची रचना केवळ एका दगडावर कोरून बनवण्यात आली आहे आणि ती एकाच दगडावर बनवलेली जगातील सर्वात मोठी आकृती आहे. कैलास मंदिर महाराष्ट्रातील एलोरा येथे स्थित आहे. राष्ट्रकूट वंशाचे नरेश कृष्ण (प्रथम) याने ७५७-७८३इ. स. मध्ये या मंदिरांची निर्मिती केल्याचे म्हटले जाते. एलोरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विस्तीर्ण मंदिरांची साखळी आहे. अखंड खडक किंवा शिला म्हणता येईल ते कट करून कैलास मंदिरात सुंदर स्तंभ बनवण्यात आले आहेत. अखंड खडक कोरून वरून खाली असे मंदिर कोरण्यात आल्याचे सांगितले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या मंदिरांवरील नक्षीकाम, सुरेख आकृत्या, कोरीव खघडण कशी बनवली असेल, हे एक रहस्य आहे. कारण त्यावेळी त्यावेळी आजच्या तंत्रज्ञानाप्रणाणे मशीन्स नव्हते. बाहेरून मूर्तींचे समूह कोरून द्रविड शैलीमध्ये मंदिराचे रूप दिले आहे. भगवान शिवच्या या मंदिराचा अद्वितीय रचनेची दखल घेत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील असंख्य सुंदर मंदिरे आणि लेण्यांमध्ये एलोराच्या कैलास मंदिराचा समावेश होतो. कैलास मंदिर अप्रतिम आहे. हे मंदिर एलोराच्या गुहा क्रमांक १६ मध्ये आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर आठव्या शतकात बांधले गेले असेल आणि ते बांधण्यासाठी येथून २ हजार टन दगड काढण्यात आले असतील. या मंदिरांची सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मंदिर ज्या पद्धतीने बांधले गेले आहे, ते आजच्या काळात इतके तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी असतानाही  अशक्य वाटते, त्यामुळे हजारो वर्षांपूर्वी हे मंदिर कसे बनवले असेल बरे? कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय आणि जास्त ज्ञानाशिवाय इतके सुंदर रेखीव मंदिर बांधले गेले आहे.  पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणताता की, आजच्या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर हे दगड काढण्यासाठी आणि मंदिर बांधण्यासाठी शंभर वर्षाहून अधिक काळ लागू शकते.
या मंदिराची लांबी २७६ फूट आणि १५४ फूट रुंदी आहे. असा अंदाज लावला जातो की, ४० हजार टन वजनाचे दगड काढले जाऊन त्यावर हे कोरवी काम करण्यात आले असावेत. आधी एक विभाग वेगळा करण्यात आला असावा आणि नंतर या खडकाच्या आत आणि बाहेरून ९० फूट उंच मंदिर कोरण्यात आले असावे.

मंदिराच्या  आत आणि बाहेर सर्व बाजूंनी शिल्पे आणि सजावटीने परिपूर्ण आहे. या मंदिराच्या प्रांगणाच्या तीन बाजूंना गाभाऱ्यांच्या रांगा आहेत. ज्या मंदिराच्या वरच्या भागाला एका पुलाने जोडलेल्या होत्या. आता हा पूल पडलेला दिसतो.  समोरील मोकळ्या मंडपात नंदीची मूर्ती विराजमान आहे. त्याच्या दोन्ही बाजूला मोठे हत्ती व खांब उभे असलेले दिसतात. हे काम भारतीय वास्तुविशारदांच्या कौशल्याचे अप्रतिम उदाहरण म्हणता येईल.

एलोरामध्ये तीन प्रकारच्या गुहा आहेत. महायानी बौद्ध लेणी, पौराणिक हिंदू लेणी आणि दिगंबर जैन लेणी. या गुंफांपैकी फक्त एक गुहा १२ मजली आहे, ज्याला 'कैलास मंदिर' म्हणतात. ही गुहा म्हणजे कारागिरीचा अप्रतिम नमुना आहे. एकाच खडकात कोरलेले विशाल मंदिराचे प्रत्येक शिल्प उच्च प्रतीचे आणि उच्च दर्जाचे आहे. या लेण्यांपासून एलोरा गाव एक किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या नावावरून त्यांना 'एलोरा लेणी' पडल्याचे म्हटले जाते.

कैलास मंदिर वगळता उर्वरित मंदिरे इ. स ६००-७५० च्या आसपास बांधली गेली असल्याचा अंदाज आहे. एलोराचे शिल्प वैशिष्ट्यपूर्ण असून गुप्त कालखंडानंतर एवढे भव्य बांधकाम इतर कोणत्याही कालखंडात झाली नाही. वर्षभर येथे देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी असते. या लेण्यांमध्ये इतके आकर्षण आणि कौशल्य आहे की, पाहणारे थक्क होऊन जातात. संपूर्ण मंदिर परिसरशांत आहे. एलोराजवळ घृष्णेश्वर महादेवाचे मंदिरदेखील आहे. लेण्यांमध्ये भव्य कोरीव काम करण्यात आले आहे. एलोराची गुहा क्रमांक १६ ही सर्वात मोठी गुफा आहे. यामध्ये जास्तीत जास्त कोरीव काम करण्यात आले आहे. येथील कैलास मंदिरात प्रचंड आणि भव्य नक्षीकाम आहे.

मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण रहस्य मनाला भिडणारे आहे. आज असे मंदिर बांधण्यासाठी शेकडो रेखाचित्रे, थ्रीडी डिझाईन सॉफ्टवेअर, सीएडी सॉफ्टवेअर, शेकडो अभियंते, अनेक उच्च शक्तीचे संगणक, लहान मॉडेल्स आणि त्याचे संशोधन इत्यादींची आवश्यकता असेल. त्या काळात ही सर्व यंत्र आणि साधनसामुग्री उपलब्ध असेल का, असा प्रश्न प्रत्येकाला पडणारा आहे.

येथे फिरण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत सर्वात चांगला काळ आहे. पण उन्हाळ्यात येथे खूप तापमान असल्यामुळे थंडीच्या दिवसात पर्यटनासाठी चांगला काळ मानला जातो.

Tuesday, September 5, 2023

Karneshwar Temple :संभाजी महाराजांचे वास्तव्य असलेले 'संगमेश्वर-कर्णेश्वर'

https://pudhari.news/maharashtra/622526/shravan-2023-maharashtra-sangmeshwar-karneshwar-temple/ar



रत्‍नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. Karneshwar Temple) त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. संगमेश्वर हे देवळांचे गाव आहे. या परिसरात सुमारे ७० पांडव कालीन देवालये आहेत. त्यातील कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष प्रसिद्ध आहे. (Karneshwar Temple)

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे तसे प्रसिद्ध ठिकाण. ऐतिहासिक गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या तालुक्याचे मुख्यालय संगमेश्वर गावापासून १७ किलोमीटरवर असलेल्या देवरुख येथे आहे. सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले आहे. ते परिसरातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्‍नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर हे मुंबई - गोवा महामार्गावर वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेने देखील संगमेश्वरला जाता येते. छत्रपती संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे. अशा ठिकाणी कर्णेश्वराचे प्राचीन मंदिर पाहायला मिळते. हे महामार्गापासून थोडे आत असल्यामुळे सहजासहजी नजरेस पडत नाही.

संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास ‘रामक्षेत्र’ असेही म्हटले जाते. संगमेश्वरला जाण्यासाठी राजापूरची गंगा ठिकाणापासून अडीच तासांचा रस्ता आहे. सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिध्द महादेव मंदिर आहे.

कर्णेश्वर मंदिर –

हे महादेवाचे प्रसिध्द मंदिर आहे. हे भूमीज नागर शैलीतील मंदिर आहे. कर्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर गावात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेपासून थोडे पुढे गेल्यावर हे आहे. इसवी सन २०१२ मध्ये या मंदिराला पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

कोल्हापुरातील खिद्रापूरच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीशी मिळते-जुळते असलेले कर्णेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर खिद्रापूरपेक्षाही जुने असल्याचे येथील मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून ओळखते. काही जण हे मंदिर कर्ण राजा (कोल्हापूर) ने बांधले असावे असे म्हणतात. तर काही जण इ.स. १०७५ ते १०९५ या काळात गुजरातच्या चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.

कर्णेश्वर या महादेवाच्या देवालयात ५ पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. देवालयात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख आहेत. कर्णेश्वराच्या देवालयाजवळ एक सूर्य मंदिर आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अतिशय आखीव रेखीव कोरीव काम असलेल्या या मूर्ती भक्तांच्या चटकन लक्ष वेधून घेतात. त्याकाळात इतकी सुंदर शिल्पे कशी काय घडवली असावीत, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. मंदिरात गेल्यानंतर भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. बाहेर कितीही ऊन पडलेलं असो वा गर्मी असो, मंदिरात पाऊल ठेवताच मनाला आणि शरीराला शितलता वाटते. गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड आहे. सोबत पार्वतीची मूर्तीही आहे. येथे सुंदर प्रभावळदेखील दिसते.

कसे जाल?

संगमेश्वर बस स्थानकापासून संगमेश्वर रेल्वेस्टेशन ४ कि. मी. अंतरावर आहे. संगमेश्वर बस स्थानकापासून देवरुख १७ कि. मी. अंतरावर आहे. साखरपाला जाण्यासाठी दर ३० मिनिटांनी देवरुख येथून बस आहेत. 'कोल्हापूर'ला जाण्यासाठी या मार्गाचा वापर होऊ शकतो तसेच संगमेश्वराहून रत्‍नागिरी, लांजा आणि राजापूरकडे जाणाऱ्या बसेस आहेत.


आजपर्यंत कुणीही उलगडू शकले नाही 'या' ५ मंदिरांचे रहस्य, असे या मंदिरांमध्ये आहे तरी काय?

https://pudhari.news/blog/630627/these-five-famous-mysterious-shiva-temples/ar


भारताची समृद्ध संस्कृती, संपत्ती, इतिहास आणि अनेक रहस्यमय गोष्टींनी वेढलेला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा एक असा देश आहे, जिथे मंदिरांच्या मागील कहाणी अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. महाराष्ट्रातील कैलास मंदिर असो वा तामिळनाडूतील ऐरातेश्वर किंवा ओडिशातील लिंगराज आजपर्यंत 'या' खास मंदिरांचे कोडे सुटलेले नाही. वर्षानुवर्षे या मंदिरांचे संशोधन सुरू आहे. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या संशोधकांना अभ्यास करूनही हाती लागलेल्या नाहीत.   

कैलास मंदिर

कैलास मंदिर हे भगवान शिवला समर्पित आहे. कैलास मंदिर सर्वात मोठे रॉक-कट मंदिर आहे. १६ व्या शतकात छत्रपती संभाजीनगरच्या एलोरा गुंफामध्ये बनवण्यात आलं आहे. कैलास गुंफा मंदिराची रचना अशी एक अद्भूत बाब आहे, जी कुणालाही न पटणारी आहे. एका मोठ्या खडकातून हे मंदिर बनवण्यात आले आहे. पुरातत्ववाद्यांच्या माहितीनुसार, अर्थ जाणून घेण्यासाठी ३० मिलियन संस्कृत नक्षी आतापर्यंत डिकोड करण्यात आलेले नाही. 

लिंगराज मंदिर 

ओडिशातील भुवनेश्वर हे सर्वात मोठे मंदिर आहे. यामध्ये भगवान शिवला समर्पित ५४ मीटरचे हे मंदिर आहे. हे मंदिर १०९० ते ११०४ ई. दरम्यान निर्माण करण्यात आलं होतं. असे म्हटले जाते की, गर्भ गृहाच्या आत, लिंगम स्वत: उत्पन्न झाले आहे, म्हणून त्यास स्वयंभू म्हटले जाते. 

ऐरावतेश्‍वर मंदिर 

तामिळनाडूमध्ये १२ व्या शतकात चोल राजांनी ऐरावतेश्‍वर मंदिराची निर्मिती केली होती. येथील मंदिराच्या पायऱ्या खूप गुढ आहेत. या पायऱ्यांमधून संगीत ऐकू येते. आश्चर्य वाटले ना? पण हे मंदिर इतक्या खास रितीने बनवण्यात आले की, या मंदिराच्या पायऱ्यांवर चढताना ध्वनी निर्माण होतात. संगीताच्या विविध ध्वनी इथे एकायला मिलतात.पण, या संगीताच्या मागे काय रहस्य आहे, हे आतापर्यंत कुणीही जाणू शकले नाही.

टिटलागढचे शिव मंदिर  

असे म्हटले जाते की, ओडिसातील टिटलागढ येथे खूप उष्णता असते. याठिकाणी एक डोंगर आहे. ज्यावर शिव मंदिर स्थापित आहे. येथील खडकांमध्ये इतकी गर्मी असते की, लोकांना घामाच्या धारा लागतात. पण  मंदिरावर उष्णतेचा कोणताही परिणाम होत नाही. मंदिरात इतकी थंडी आहे की, अनुभवणाऱ्यास आश्चर्य वाटेल. इतक्या गरमीमध्ये हे मंदिर इतके थंड कसे असू शकते? मंदिराच्या बाहेर येताच पुन्हा गरमीने बेहाल होतं.

 

निष्कलंक महादेव मंदिर 

अरब समुद्राच्या किनारी निष्कलंक महादेव मंदिर एक प्रसिद्ध रहस्यमयी मंदिर आहे. हे मंदिर गुजरातच्या भावनगरमध्ये कोलियाक समुद्रकिनारी असून या पवित्र मंदिरात ५ शिवलिंग आहेत. हे स्वयंभू मंदिर असल्याचे म्हटले जाते. अरब सागराजवळ हे मंदिर असल्याने समुद्रात भरती आल्यावर शिवलिंग पाण्याने झाकून जाते. या मंदिराचा इतिहास महाभारत काळापासून जोडले गेले आहे. असे म्हटले जाते की, या ठिकाणी पांडवांनी अनेक वर्ष तप केलं होतं, असेही म्हटले जाते. 


Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...